♢♢♢संकलन प्रारंभ ♢♢♢
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
उद्या रविवार " विचारमंथन " भाग 55
विषय :- * स्कूल चले हम * अर्थात * आई शाळेत जायचय मला *
परीक्षक :- सौ ,संगीता देशमुख ( माई )
संकलन :- श्री ,गजानन पवार
ग्राफिक्स :- उत्कर्ष देवणीकर
ब्लाॅग ऑपरेटर :- संजय पाटील
वेळ :- सकाळी 10 ते सायं , 5
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
🌹🍁चिंतनस्पर्धा 🍁🌹
🌷चला शाळेला🌷
आजचा विषय आहे...
चला शाळेला
शाळेची आठवण झाली की खरंच अजूनही.. म्हणजे
वयाच्या बहात्तरीत असतानाही वाटत राहतं..
परत लहान व्हावं... शाळेत जावं... लक्ष देऊन बाईंचं
शिकवणं ऐकावं.... मन लावून अभ्यास करावा... उत्तम गुण प्राप्त करावेत..
शाळेतील प्रत्येक स्पर्धेत
हिरिरीने भाग घ्यावा...
पूर्ण प्रयत्नांनी पहिला नंबर
काढावा आणि बाईंची शाबासकी मिळवावी.
खरोखर ही सारी स्वप्नं
शाळेतच पूर्ण होतात.
शाळा म्हणजे मुलामुलींच्या मनावर उत्तमोत्तम संस्कार
करणारी, त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण लावणारी,
मलांची क्षमता, योग्यता,
कुवत वाढविणारी व त्यांना
स्वतःच्या पायावर उभी करणारी.. एक महत्त्वाची संस्थाच असते.
आपला लहानपणीचा
जास्तीत जास्त काळ हा...
शाळेत.. गुरुजन व मित्र मैत्रिणींसमवेत जात असतो.
घरी पालकांच्या व शाळेत गुरुजनांच्या...... शिस्त, देखभाल व निगराणीत मुलं
मोठी होत असतात. वाढत
असतात.
त्यांची क्षमता, कुवत
व योग्यतेप्रमाणे ती ग्रहण
करीत असतात...
व तसेच घडायला हवे.
घरातून शाळेतून उत्तेजन,
प्रोत्साहन मिळत जाते...
मुलांची प्रगती होत जाते...
त्यांच्या पंखात बळ येत
जाते आकाशात स्वतंत्रपणे झेप घ्यायला ते समर्थ होत जाते.. सक्षम बनत जाते.
.. आपल्या आयुष्यात शाळेचे, गुरुजनांचे अशा
प्रकारचे हे....
केवढे तरी मोठे, महान योगदान असते. अर्थात मुलेही तेवढीच स्पंदनशील,
टीपकागदाप्रमाणे... शिकवलेले सर्व आत्मसात
करणारी हवीत. आचरणात
आणणारी हवीत. नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी !
...... असेच होणार की !
लग्नानंतर १३ वर्षांनी
( आधी मॅट्रीक होते.) पुढील
शिक्षण सुरू केलेले.
बी. ए. पार्ट वन ते
पी एच् डी.. हा २१ वर्षाचा काळ सुवर्णकाळ वाटला होता. पण शालेय जीवनही खूप भर्जरी म्हणावे..
असेच गेले.
आज अगदी असेच मनापासून वाटते आहे.
खच्चून आणि टिच्चून म्हणावा.. असा अभ्यास करत,
सर्व स्पर्धेत, सर्व उपक्रमात भाग घेत..... कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळवत.. राज्य पातळीवरही अनेक
पारितोषिके, अनेक बक्षिसे मिळवत सर्व गुरुजनांची लाडकी विद्यार्थिनी तर झालेच होते.
सर्वप्रिय मैत्रिण म्हणूनही निवड होऊन...
निर्मलाराजे भोसले
... यांचे हस्ते प्रशस्तीपत्र
मिळाले होते.
म्हणूनच या गहिऱ्या दिवसांची आठवण झाली की प्रकर्षाने वाटतं.
चला परत शाळेला.
@ 05 डॉ. शरयू शहा.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
विचारमंथन
आई शाळेत जायचंय मला
नमस्कार
आमच्या घरात मीच मोठी.पहिली बेटी धनाची पेटी,वडीलांची लाडकी लेक,
कर्जत माझे माहेर. आम्ही वाड्यात रहायचो.वाड्यात एकी होती.बरोबरीची मुले मुली खूप .इतरांचे पाहून,मी हट्ट धरला मलाही शाळेत जायचेय.बालवाडीत घातले आईने मला.गणपतीच्या देवळात शाळा भरत असे.आईची मैत्रिण मंजूमावशी शाळा घ्यायच्या.वय चार .वार. महिने ,नक्षत्र तोंपाठ होते घरी धार्मिक वातावरण होते शुभंकरोती परवचा इ.आईने शिकवले होते त्यामुळे बाईंची मी लाडकी. पण मी एका ठिकाणी बसत नाही सारखी जागा बदलते अशी त्या आईकडे लटकु तक्रार करत.नंतर मराठी शाळा ,जीवन शिक्षण मंदिर.१ली ते ४थी पर्यंत तेथेही मी सर्वांची लाडकी होते जोशी बाई वाड्यातच रहात.पाटील गुरुजी म्हाथात्रे गुरुजी अजुनही आठवाण येते सर्वांची.प्रार्थना म्हणायला आम्ही तिघी पुढे असू
नंतर अभिनव ज्ञान मंदिर १२वी पर्यंत मग k m c collage खोपोली .ते मी नोकरी करुन शिकले रेल्वेत नोकरी होती.अजुनही शाळेची आठवण येते
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा.
आवडती कविता.माझे निबंध बाई वाचुन दाखवायला सांगत मला सर्वांना,चित्रकला मात्र यथातथाच b grade.
पाच वर्षापूर्वी आमच्या शाळेच्या १० वी १२ वी बँचचे स्नेहसंमेलन झाले.
सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटले.तो काळ जुना ७६ची नवी दहावीची बँच,मुलेमुली फार बोलत नसू आम्ही पण आता दिलखुलास गप्पागोष्टी झाल्या .मजा आली तो अविस्मरणिय दिवस होता आमच्यासाठी.
आता आमची मुले काँलेजात होती .आणि मुले आम्हाला शाळेत सोडायला आली होती माझा मुलगा गाडी चालवत होता .आहे की नाही गंमत .
स्कूल चले हम चाळीशीत.
टीव्ही वर सलिल कुलकर्णींची शाळेला भेट देण्याची सिरियल झाली नि वाटले आपणही आता शाळेत असतो तर मजा आली असती
त्यावर मी कविता केलेली.
पुनः वाटते लहान व्हावे
शाळेत पुनश्च फिरुनी जावे
सलिलदाने शाळेत यावे
सोपे सोपे प्रश्न विचारावे.
टीव्हीवरती आम्ही दिसावे
पुनं वाटते लहान व्हावे.
इति लेखनसीमा
प्राची देशपांडे
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
विचारमंथन
आई शाळेत जायचंय मला
नमस्कार
आमच्या घरात मीच मोठी.पहिली बेटी धनाची पेटी,वडीलांची लाडकी लेक,
कर्जत माझे माहेर. आम्ही वाड्यात रहायचो.वाड्यात एकी होती.बरोबरीची मुले मुली खूप .इतरांचे पाहून,मी हट्ट धरला मलाही शाळेत जायचेय.बालवाडीत घातले आईने मला.गणपतीच्या देवळात शाळा भरत असे.आईची मैत्रिण मंजूमावशी शाळा घ्यायच्या.वय चार .वार. महिने ,नक्षत्र तोंडपाठ होते घरी धार्मिक वातावरण होते शुभंकरोती ,परवचा इ.आईने शिकवले होते त्यामुळे बाईंची मी लाडकी. पण मी एका ठिकाणी बसत नाही सारखी जागा बदलते अशी त्या आईकडे लटकी तक्रार करत.नंतर मराठी शाळा ,जीवन शिक्षण मंदिर.१ली ते ४थी पर्यंत तेथेही मी सर्वांची लाडकी होते.अभ्यासात पुढे एकपाठी . जोशी बाई वाड्यातच रहात.पाटील गुरुजी ,म्हात्रे गुरुजी पाटणकर बाई अजुनही आठवण येते सर्वांची.प्रार्थना म्हणायला आम्ही तिघी पुढे असू
नंतर अभिनव ज्ञान मंदिर १२वी पर्यंत मग k m c collage खोपोली .ते मी नोकरी करुन शिकले रेल्वेत नोकरी होती.अजुनही शाळेची आठवण येते
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा.
आवडती कविता.माझे निबंध बाई वाचुन दाखवायला सांगत मला सर्वांना,चित्रकला मात्र यथातथाच b grade.
पाच वर्षापूर्वी आमच्या शाळेच्या १० वी १२ वी बँचचे स्नेहसंमेलन झाले.
सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटले.तो काळ जुना ७६ची नवी दहावीची बँच,मुलेमुली फार बोलत नसू आम्ही पण आता दिलखुलास गप्पागोष्टी झाल्या .मजा आली तो अविस्मरणिय दिवस होता आमच्यासाठी.
आता आमची मुले काँलेजात होती .आणि मुले आम्हाला शाळेत सोडायला आली होती माझा मुलगा गाडी चालवत होता .आहे की नाही गंमत .
स्कूल चले हम चाळीशीत.
टीव्ही वर सलिल कुलकर्णींची शाळेला भेट देण्याची सिरियल झाली नि वाटले आपणही आता शाळेत असतो तर मजा आली असती
त्यावर मी कविता केलेली.
पुनः वाटते लहान व्हावे
शाळेत पुनश्च फिरुनी जावे
सलिलदाने शाळेत यावे
सोपे सोपे प्रश्न विचारावे.
टीव्हीवरती आम्ही दिसावे
पुनं वाटते लहान व्हावे.
इति लेखनसीमा
प्राची देशपांडे
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
🌹🍁चिंतनस्पर्धा 🍁🌹
🌷चला शाळेला🌷
आजचा विषय आहे...
चला शाळेला
शाळेची आठवण झाली की खरंच अजूनही.. म्हणजे
वयाच्या बहात्तरीत असतानाही वाटत राहतं..
परत लहान व्हावं... शाळेत जावं... लक्ष देऊन बाईंचं
शिकवणं ऐकावं.... मन लावून अभ्यास करावा... उत्तम गुण प्राप्त करावेत..
शाळेतील प्रत्येक स्पर्धेत
हिरिरीने भाग घ्यावा...
पूर्ण प्रयत्नांनी पहिला नंबर
काढावा आणि बाईंची शाबासकी मिळवावी.
खरोखर ही सारी स्वप्नं
शाळेतच पूर्ण होतात.
शाळा म्हणजे मुलामुलींच्या मनावर उत्तमोत्तम संस्कार
करणारी, त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण लावणारी,
मलांची क्षमता, योग्यता,
कुवत वाढविणारी व त्यांना
स्वतःच्या पायावर उभी करणारी.. एक महत्त्वाची संस्थाच असते.
आपला लहानपणीचा
जास्तीत जास्त काळ हा...
शाळेत.. गुरुजन व मित्र मैत्रिणींसमवेत जात असतो.
घरी पालकांच्या व शाळेत गुरुजनांच्या...... शिस्त, देखभाल व निगराणीत मुलं
मोठी होत असतात. वाढत
असतात.
त्यांची क्षमता, कुवत
व योग्यतेप्रमाणे ती ग्रहण
करीत असतात...
व तसेच घडायला हवे.
घरातून शाळेतून उत्तेजन,
प्रोत्साहन मिळत जाते...
मुलांची प्रगती होत जाते...
त्यांच्या पंखात बळ येत
जाते आकाशात स्वतंत्रपणे झेप घ्यायला ते समर्थ होत जाते.. सक्षम बनत जाते.
.. आपल्या आयुष्यात शाळेचे, गुरुजनांचे अशा
प्रकारचे हे....
केवढे तरी मोठे, महान योगदान असते. अर्थात मुलेही तेवढीच स्पंदनशील,
टीपकागदाप्रमाणे... शिकवलेले सर्व आत्मसात
करणारी हवीत. आचरणात
आणणारी हवीत. नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी !
...... असेच होणार की !
लग्नानंतर १३ वर्षांनी
( आधी मॅट्रीक होते.) पुढील
शिक्षण सुरू केलेले.
बी. ए. पार्ट वन ते
पी एच् डी.. हा २१ वर्षाचा काळ सुवर्णकाळ वाटला होता. पण शालेय जीवनही खूप भर्जरी म्हणावे..
असेच गेले.
आज अगदी असेच मनापासून वाटते आहे.
खच्चून आणि टिच्चून म्हणावा.. असा अभ्यास करत,
सर्व स्पर्धेत, सर्व उपक्रमात भाग घेत..... कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळवत.. राज्य पातळीवरही अनेक
पारितोषिके, अनेक बक्षिसे मिळवत सर्व गुरुजनांची लाडकी विद्यार्थिनी तर झालेच होते.
सर्वप्रिय मैत्रिण म्हणूनही निवड होऊन...
निर्मलाराजे भोसले
... यांचे हस्ते प्रशस्तीपत्र
मिळाले होते.
म्हणूनच या गहिऱ्या दिवसांची आठवण झाली की प्रकर्षाने वाटतं.
चला परत शाळेला.
@ 05 डॉ. शरयू शहा.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
मी सुलभा कुलकणीॅ
विचार मंथन
आई!मला शाळेत जायचे!
माझे वय सागायला वाटते लाज. तरी मला आजही शाळेत जावेसे वाटते. पिशवीचे दप्तर,दगडी पाटी पेन्सील पट्टी, पाटी पुसायचे फडके व स्पंजाची डबी आठवते सारे!
माझे शिक्षक, माझ्याबाई आणि माझ्या शाळेची ईमारत नळबाजार म्यु म. शाळा 4था कुभारवाडा.अशी पाटी लिहीलेली शाळा आठवते.
याच शाळेत आयुष्याची सुरूवात करतो आहे हे न कळणारे वय! पण पाटीवर गमभन आणि12345 हे अंक काढल्यावर पाठीवरची शाबासकी आठवते. पण अक्षर खराब म्हणून ग 25वेळा गिरवावा लागला हे ही आठवते.
हळूहळू अभ्यासची लागलेली गोडी चालीवर म्हटल्या जाणा-या कविता गाणी. हावभावयुक्त गोष्टी सगळे आठवते फूलपाखरू छान किती दिसते. नाच रे मोरा लहान माझी बाहुली नाचून म्हणून दमल्यावर वाटीतील गूळशेगदाणे चवीचे आठवतात
हळूहळू सवाॅची लाडकी
सोनू 4थी पास झाली आणि नळबाजार शाळा सुटली खेतवाडी शाळा 7वी पयॅत नंतर पुढे कन्याशाळा मॅट्रीकची परिक्षा.3वेळा शाळेचा निरोप समारंभ अनुभवावा लागला.शाळा सोडताना खूपच वाईट वाटले पण अजूनही आवडते मज मनापासूनी शाळा असेच म्हणावेसे वाटते.
नातवाबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट धरावासा वाटतो. बसायला आसन,
पहिला बाक मित्रमैत्रीणी शाळेत मिळणारा खाऊ मुख्य शिक्षणाची आवड म्हणून आता म्हणावेसे वाटते.
प्रतिक बाळा तुझ्या आजीला तुझ्याबरोबर मला पण शाळेत जायचे आहे.
आज विचारमंथनाने संधी मिळवून दिली त्याबद्दल साहित्यमंथनचे आभार
चला आता गझलशाळेत जाऊ या. ती पण शाळाच ना!
चला आई दादा मला शाळेत जायचे! नाव घाला माझे.
नमस्ते गुरूजी आणि बाई.
धन्यवाद दप्तर भरते आहे.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
काही दिवसापुर्वी मी एक सत्त्य लघुकथा लीहीली होती..ही कथा माझा अनुभव आहे व या कथेतील पात्र " सुकेशना " ही आपल्या आई वडीलांना न बोलता ही अबोलपणे हेच सांगतेय की
" आई,शाळेत जायचय मला "
👇👇👇👇👇👇👇👇
मी मूलगी म्हणून का ?
"सर, माझ्या वडीलांनी क्लासला जायच नाही असं सांगितलय,"आठवीत असणाऱ्या सुकेशनाचा थरथरता आवाज माझ्या अंतरमनाचा ठाव घेत होता...मी म्हटलं,"का गं?" ती म्हणाली," सर माझा लहान भाऊ चौथीत शिकतोय,इंग्लीश मेडीयमला..वडील म्हणतायत की त्याची शाळेची फीस व ट्युशनची फीस भरायचीय,तुझी ट्युशन बंद कर...त्याची फीस भरेन तुझी भरणार नाही.."मला सर्व काही कळालं होतं..
तीनं सांगीतलेलही अन् न सांगीतलेल ही..आजही मुलगा आणी मुलगी हा फरक
होतोय..सरकारी शाळेत शिकणारी सुकेशना...अतिशय हुशार मुलगी..सतत काही तरी नवीन शिकण्यासाठी धडपडणारी..इतक्या लहान वयातही आपलं मन मारुन जगतेय तिच्या वाट्याचं भावाला देतेय..माझं मन आतुन झुरत होतं..का असा फरक...?
न राहवून मी शेवटी तिच्या घरी फोन केला..योगायोगाने फोन तिच्या आईने उचलला...मी विचारलं," सुकेशनाला ट्युशनसाठी नको का म्हणताय..हुशार आहे ती..येऊ द्या तिला..पलीकडुन आवाज आला," सर नको म्हटलेत हो हेनी,पैसे नाही म्हणत्यात". मी म्हटल,"मुलाला महागड शिक्षण देताय अन् मुलीला असं का करताय हो" माझा बोलण्याचा अधिकार नव्हता तरीही न राहवून हेे शब्द गेले..या शब्दाने जणु त्या माऊलीच्या मनाचा बांधच तुटला..
"असच करत्यत सर हेनी, पोरीला साधी वही बी घेऊन देत न्हाईत,पोरगी बी लई घाबरत्याय त्यांना...काय सुद्दीक बोलत नाय त्यांच्या म्होरं" आवाजातील कंप वाढत गेला..त्या आवाजातील द्रावकता हृदयाला जाऊन भिडली....मातेचा आपल्या मुलीसाठी तुटणारा जीव व स्त्री असल्याकारणाने स्त्री जातीबद्दल तीला वाटणारी अनामीक ओढ जाणवली..
माझा त्या वर्गावरील तास संपला होता..पुढील तास घेण्यासाठी संपत गायकवाड सर येऊन थांबले होते..त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील भाव जाणले असावे कदाचीत..ते म्हणाले..
" Any problem sir..? "
मी सर्व हकिकत सांगितली...त्यांनी लगेच उत्तर दीलं," सुकेशनाला १०वी पर्यंत कोणतीही फीस घ्यायची नाही..गरज पडल्यास वह्या पुस्तकाचा खर्च ही आपण करु" माझ्या मनावरचा फार मोठा भार कमी झाल्यासारख वाटल..
वाटलं की दोन समविचारी व्यक्ती एकत्रीत आल्यानंतर कामं सोपी होतात...आणि होतातच..सुकेशनाच्या वडीलांना भेटण्याची अतीदाट इच्छा मनात होती...क्लास सुटल्या नंतर भेटीसाठी गेलो..गळ्यात वारकरी संप्रदायी लोकांची माळ,कपाळावर गंधाचा टीळा आता या माणसाला काय बोलावं..?
संपत सरांनी व मी एकमेकांकडे पाहुन स्मीत हास्य केलं..सुकेशनाच्या आईने चहा घेऊन जाण्याचा आग्रह केला..चहा घेत घेत सुकेशनांच्या पालकांना आमचा निर्णय सांगितला..सुकेशना व तीच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव ही आमची अमुल्य कमाई घेऊन आम्ही तेथुन नीघालो...आज मनाला खुप मोठी शांती लाभली होती..
@ उत्कर्ष देवणीकर
उमरगा
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
"आई,शाळेत जायचं मला"
सध्या शाळाना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. पण आज मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्याना शाळेत प्रवेश देण्यासाठी आपल्या शहरातीलच नाही तर आजूबाजूच्या मोठ्या शहरातील शाळानशाळा पिंजून काढत आहेत कारण त्याना आपल्या पाल्याला उत्तमात उत्तम शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा आहे. आपल्या पाल्याने आत्तापासूनच म्हणजे वयाची अडीच वर्षे पूर्ण केले तेव्हापासूनच तो उत्कृष्ट हवा आहे. आज त्याचा पाया पक्का होऊन त्याच्या वयोगटातील मुलांसोबत तो स्पर्धेत अव्वल राहिला पाहिजे,ही मध्यमवर्गीय पालकांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी हा उन्हाळा सुध्दा त्याना स्वस्थ बसू देत नाही. प्रत्येक शाळेला भेट देऊन इमारत,तेथील भौतिक सुविधा,तेथील विषय,शिकविणारे शिक्षक या सर्व बाबींची कसून पाहणी सुरु आहे. एवढेच नाही तर, घरी येऊन पुन्हा पती-पत्नी,शेजारीपाजारी,यांच्यात चर्चा करुन भरमसाठ देणगी सह शाळेची फीस भरून मुलाचा प्रवेश निश्चित केला जातो. एकदा प्रवेश केला की,मग सुरु होते शालेय साहित्याची उच्चदर्जाची खरेदी! आठवड्यातील कमीत कमी तीन गणवेश,तीन शूज,स्कूलबॅग,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाजवतील अशा वह्या,वेगवेगळ्या प्रकल्पाची पुस्तके अन् अजून बरेच काही!हे सगळे करताना पालकाना फक्त एक समाधान असते की,आपण आपल्या मुलाला प्रतिष्ठीत शाळेत टाकून आपण आपली प्रतिष्ठा जपली.हे आहे मध्यमवर्गीय मुलांचे शाळेत जाणे.
हे आहे आपल्याभोवतीचे वलय! हे मर्यादित वलय सोडून आपण थोडे दोन पावले पुढे गेल्यावर लक्षात येईल की,"आई,मला शाळेत जायचंय!" ही आर्त हाक हवेतच विरुन जाते. आपल्या देशात दारिद्र्य आणि श्रीमंती ही विषमता कमालीची आहे. एकीकडे शाळेत प्रवेश द्यायचा म्हणून पायपीट तर दुसरीकडे पोटासाठी हिंडणाऱ्या लोकाना मुलांच्या शिक्षणाबाबत कमालीची उदासिनता आहे. उदासिनता म्हणण्यापेक्षा शिक्षणापेक्षा पोट भरण्याचा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा असतो. त्या मुलाना ना पोटभर अन्न मिळतं ना अंगभर कपडा! आपला मुलगा शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा आज त्याने काम करुन कुटुंबाला हातभार लावणे,आणि आईवडील कामावर गेल्यावर मुलीने घरकाम करुन लहान भावंडाना सांभाळणे,ही त्यांची गरज असते.
अशा कुटुंबातील मुलामुलींनाही आपल्या आजूबाजूची मित्रमैत्रिणी शाळेत जातात,छान गणवेश घालतात,पाठीवर दप्तर टाकून गाडीत बसून जातात,तो/ती पाठीवर दप्तर टाकतो तेव्हा ह्याच्या डोक्यावर भारा तर हिच्या कडेवर लहान भावंड किंवा पाण्याची घागर असते. तेव्हा याचेही मन आतून साद घालते,"आई,मला शाळेत जायचंय!" पण ही हाक ऐकायला त्याच्या आईला वेळच कुठे असतो?? त्या लेकरांच्या डोळ्यांत स्वप्न पेरायला किंवा किंवा त्याच्या डोळ्यातील स्वप्न वाचायला वेळ नसतो.
ही दरी मिटविणे शक्य नसले तरी यातील अंतर आपण बरेचसे कमी करु शकतो.
"जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना,
तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना"
या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्या संवेदना जागृत असल्या तर आपण हे विषमतेचे अंतर निश्चितच कमी करु शकतो. आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणावर जेवढा खर्च करतो,त्याच्या २०% जरी खर्च आपण अशा गरजवंताच्या शिक्षणावर केला तरी त्या वंचिताचे "आई,मला शाळेत जायचय!" हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तोही भावी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो व माणूस म्हणून स्वाभिमानाने जीवन जगू शकतो.
संगीता देशमुख,वसमत @59
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
साहित्य मंथन – विचार मंथन द्वारा –आयोजित स्पर्धा – भाग –५५वा.
विषय – आई शाळेत जायचय मला प्रेषक—कुंदा पित्रे (४६)
खरं म्हणजे वरील शब्दच माझ्या वाट्याला आले नाहीत.कारण एकत्र कुटुंबात आई हा शब्दच हरवला होता.शिवाय माझे वडिल गावातील मोठी थोर व्यक्ती होती. शाळा त्यांनीच स्थापन केलेली होती. मी भावंडातील शेंडेफळ मग काय मोठी भावंडे ज्या शाळेत गेली तिथेच मी जाऊ लागले. खर तर माझे शिक्षण त्रिस्थळी,त्रिवेणी संगमावर उभे आहे.पण ममाझे पहिली ते सातवी गावाच्या शाळेचे शिक्षण परत येईल कां ? जशी पहिली नेसलेली साढी,पहिलं प्रेम,पहिला पाऊस याला जसं ह्रदयाच्या कोप-यात घट्ट स्थान असते ना ! तसं हा विषय मिळाला व साठ वर्षापूर्वीचा काळ जिवंत झाला.नव्या पुस्तकांचा नाकात शिरलेला वास अजूनही रेंगाळतोय आता जरी मोठाली पुस्तके पालथी घातली तरी.,पावसात कागदी होड्या करुन सोडण्यापासून ते आंब्याच्या दिवसात कै-या पाडून फ्रॉकच्या खिशात मीठ तिखट आणून मैत्रीणीबरोबर घेतलेला आस्वाद, शाळेत साजरा होणारा शारदोत्सव त्यात घेतलेला सहभाग,आवाज बरा असल्याने रोज म्हटलेली प्रार्थना,झेंडावंदनाच्या वेळी म्हटलेली स्वातंत्र्यगीते.वरं अभ्यासात वा शाळेत कधी स्पर्धा नसत,दोन हजार वस्तीच गांव तेथे कुठे स्पर्धा वगैरे पण माझा वर्गात नेहमी दुसरा तिसरा नंबर असे कारण गणित हे यमदुतासारखे भासे.असो.फ्रॉकातून, परकरातून,साडीत आले कळलेच नाही कारण सातवी झाल्यावर पुढिल शिक्षणाचे दरवाजे बंद झाले.पण घरातील स्त्री,मनोहर,किर्लोस्कर ४५० जुने अंकाची पारायणे केली. शाळेत जायचेच हा अंकुर मात्र कायम जागृत राहिला. तब्बल सहा वर्षानी मुंबईत येणे होऊन आठवीत प्रवेश व विवाहाची वेदी देखील पार झाली. परंतु शाळेत जायचयं हे ब्रीद कायम गिरगांवातल्या मुलींच्या शाळेत प्रवेश तिथे सुध्दा दुसरा नंबर कधी सोडला नाही. इथेही वर्गातील मुली पांचवीपासुन इंग्रजी घेतलेल्या मी तेव्हा एबीसीडी शिकत होते – म्हणून इंग्रजी – परकी ती परकीच राहीली.तिच्याशी नाळ जुळलीच नाही. एसएसी(अकरावी)साठाला थोडे कमी मार्कस् मिळवून गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले परत सासुरवाशीण ! कौतुक कोण करणार ! कारण वयाने मोठी म्हणून शाळेत अनफिट,घरात शिक्षण कमी म्हणून अनफिट हे कळले तरी मनातला पुढील कॉलेज शिक्षणाचा वसा सोडणार नव्हतेच पण मला नवागताची चाहुल लागली. जुळे जन्माला आले मग पुढे परत चार वर्षे शिक्षण डोक्यातून बाजूला पडले,चार वर्षानंतर मला मिस्टरांचे गुरुजी भेटले त्यांचा एस एन डी चा क्लास होता म्हटले चला कॉलेज नाही तरी बाहेरुन तरी शिकून पुढे जायला काय हरकत आहे. कारण मुले अगदीच छोटी होती आणी शिकायची तहान मी तडक एम एम मराठी घेऊन पुर्ण केली तिथेसुध्दा हायर सेकंड क्लास सोडला नाही. या शिक्षणाच्या त्रिस्थळी यात्रेत मला चांगले मार्गदर्शक ,गुरुजन भेटले. मनाची मशागत नितळ,साजरी गोजीरी झाली. बाहेरच जग कसे असते त्याचा अनुभव मिळाला. आयुष्याची जडण घडण मजबूत झाली. विचाराना दिशा मिळाली.मुलं लहान शिवण शिकले पण पुढे उपयोग केला नाही मग गायन शिकत होते पण वयाच्या ५५ वला भवगीत शिकू लागले पण काही अडचणीमुळे सोडले. रेकी दोन भाग शिकले.एक्युप्रेशर शिकले. पण उपयोगात आणले नाही. पण अरोमा थिअरपी शिकले ती इतकी भावली की, आजही मी गुडघ्यावरची तेले बनवून देते. मालीश ,फेसियल करते.१९७६ ते १९९२ पर्यत माझे वाचन थांबले होते. पण १९९२ ला लोकसत्तात सहज म्हणून दिलेला लेख प्रकाशित झाला व मी हातात लेखणी घेतली. ब-याच मोठमोठ्याच्या मुलाखती घेतल्या व कथा लिहल्या. साहित्य मंथन परिवारात दाखल होऊन लिखाणकाम व साहित्याचे पदर शिकतेच आहे. आता संध्याकाळ हळूङळू सरकत येत आहे. पण गांवाची छोटी शाळा विसरु शकत नाही. आतासारखी चढाओढ नव्हती,शिक्षण महाग नव्हते,आम्हा मुलांच्या मनात अतिरेकी विचार नव्हते. सुंदर बालबोध वातावरण होते. फुलपाखरां रंगीवेरंगी मन होतं.मैत्रीणीचं गीत होतं,मला शिकायचयं हा ध्यास मात्र मी माझा पुरविला कोणाच्याही प्रोत्साहनाशिवाय,प्रेमाशिवाय! अजूनही नवं शिकण्याचा उत्साह आहे. त्याचे पडघम माझ्या मनांत वाजत असतात. साहित्यमंथनला धन्यवाद माझ्या मनातले लिहण्याची संधी दिल्याबद्दल!!
प्रेषक – कुंदा पित्रे- दादर,मुंबई ९३२४७४२७०६
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
आई मला शाळेत जायचय .....
काहीवर्षांपूर्वी म्हणजे २०१३ ला ...माझी बँकेतून सेवानिवृत्ती झाल्यावर मला महाराष्ट्रातील धुळे झील्ल्यात शहादा येथे एक खेडेगावातल्या शाळेला भेट देण्याचा योग आला .मझी नणंद तिथे गेली ३५ वर्ष सातत्याने काम क रते आहे .पुरवी तिचे पती व ती एक शाळा चालवत आणि त्यांचा स्वतःचा मुलगा पrimary पर्यंत त्याच शळेत शिकला..नंतर मुंबईला येवून उच्च शिक्षण घेवून सध्या सिंगापोर इथे phd करत आहे .असो
ती शाळा पाहून मी थक्क झाले मुलांचे १० च्या संखेत गट पाडले होते व प्रतयेक गटाला एक
शिक्षक! सर्व शिक्षक मुंबई अथवा कुठल्यातरी शहरातला ....त्यामुळे शिकवण्याला पण चांगला दर्जा !शिस्त तर एवढी की मुलांना कामं नेमून दिलेली असतात ....काहीजण झाडलोट तर काहीजण सुशोभीकरण ...म्हणजे दारापुढे अंगणातल्या फुलांची रांगोळी...पानांनी सजावट वगैरे....त्यामुळे मुलांची creativity दिसते...
वर्ग सुरु झाल्यावर शिस्तीत नेमलेला monitor त्याचं काम करू लागे कांही मुल शळेत अनवाणी येत
आई मला शाळेत जायचं आहे एवढच पुष्कळ असतं त्यांच्यासाठी ...शिकवताना distraction अजिबात नाही कारण तयांना दुसरं काही distraction नसतच .शिक्षकांचं मात्र प्रचंड कौतुक वाटलं.अश्या मुलांना घडवणं हे अत्यंत चाल्लेन्गिंग काम वाटलं.
आपण पहातो कि ह्यातलाच एखादा मुलगा पुढे जाऊन नांव काढतो.....जस माझ्या नणंदेचा मुलगा स्वतःला सिद्ध करतो आहे ....एवढंच नाही तर सिंगापोर हून आल्यावर तोही त्याच गावी योगदान देणार आहे
आपल्यला सर्व सुलभ मिळूशत असतांना अशाप्रकारे त्याग करणार्यांना माझा salaam
🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
नयना कुलकर्णी.....१५
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
आई मला शाळेत जायच आहे!
हा विषय वाचला आणि माझ बालपण डोळ्यापुढे आल.
माझा जन्म मुंबईचा.लहान कुटुंब. दोन भाऊ ,मी एकटी आई ,वडिलांची लाडाची लेक. माझ्यांत आणि माझ्यांत अवघ दिड वर्षांचे अंतर. दोघांनाही एका वर्गांत बसविले. मी बडबडी, धिटुकलीम्हणुन सर्वांची लाडकी. वर्गांत सर्वांनपेक्षा लहान,म्हणुन शाळा सुटल्यावर ,सर मला खांद्यावर बसवुन घरी सोडायचे. अशी १,२ री घराजवळ शाळा होती ती संपली . मग किंगजाॅर्ज सारख्या मोठ्या शाळेत जायला लागलो. बाई कडक होत्या. शिक्षा म्हणुन डस्टर फेकुन मारायच्या. पण त्या पण माझ्या हुषारीवर, धीटाईवर खुष होऊन ,मला माॅनेटर केले .नाचांत, नाटकांत घ्यायच्या. भाऊ माझा पाठीराखा होता.दिड वर्षांनीच मोठा पण काळजी घ्यायचा. घरी भांडायचा,दादागिरी करायचा पण वर्गांत पाठराखण करायचा. सगळ्या बाईंची लाडकी होते.
पाचवी पासुन मुला-मुलींची शाळा वेगळी झाली तेव्हां भाऊची ऊणिव जाणवायची. शाळेत शिस्त ,पद्धत,पाढे मराठीच्या कविता खुप सुंदर शिकवायच्या . त्या चालीवर अख्खा वर्ग म्हणायचा. त्यामुळे कवितांची गोडी लागली. शाळेला मोठ्ठे पटांगण. त्यात लंगडी, हुतुतु,डाॅजबाॅल,लेझीम सर्व खेळ शिकलो. गॅदरिंगला नाच, नाटुकली केली त्यामुळे धीटपणा आला. वक्रुत्व स्पर्धेत भाग घेतल्यांने कसे बोलावे हे बाईंनी शिकविले. तिसरी ते अकरावी एका बाकावर कांचन होती त्यामुळे अजुनही घट्ट मैत्री राहिली आहे.फक्त गाण्याचा गळाभेट नसल्याने गाण््याच्या तासाला बाई बडबड केली कि ,शिक्षा करायच्या. पण तितकेच प्रेमही करायच्या.
अशी माझी शाळा सुंदर, बाई, मैत्रिणी खुप शिकवुन गेल्या. तीला कधीच विसरणार नाही. पुढला जन्म असलाच तर परत ह्याच शाळेत मला जायचंय !
सौ. निलाक्षी विद्वांस ६८
स्पर्धेसाठी .
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
♢♢♢♢संकलन समाप्त ♢♢♢♢
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
उद्या रविवार " विचारमंथन " भाग 55
विषय :- * स्कूल चले हम * अर्थात * आई शाळेत जायचय मला *
परीक्षक :- सौ ,संगीता देशमुख ( माई )
संकलन :- श्री ,गजानन पवार
ग्राफिक्स :- उत्कर्ष देवणीकर
ब्लाॅग ऑपरेटर :- संजय पाटील
वेळ :- सकाळी 10 ते सायं , 5
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
🌹🍁चिंतनस्पर्धा 🍁🌹
🌷चला शाळेला🌷
आजचा विषय आहे...
चला शाळेला
शाळेची आठवण झाली की खरंच अजूनही.. म्हणजे
वयाच्या बहात्तरीत असतानाही वाटत राहतं..
परत लहान व्हावं... शाळेत जावं... लक्ष देऊन बाईंचं
शिकवणं ऐकावं.... मन लावून अभ्यास करावा... उत्तम गुण प्राप्त करावेत..
शाळेतील प्रत्येक स्पर्धेत
हिरिरीने भाग घ्यावा...
पूर्ण प्रयत्नांनी पहिला नंबर
काढावा आणि बाईंची शाबासकी मिळवावी.
खरोखर ही सारी स्वप्नं
शाळेतच पूर्ण होतात.
शाळा म्हणजे मुलामुलींच्या मनावर उत्तमोत्तम संस्कार
करणारी, त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण लावणारी,
मलांची क्षमता, योग्यता,
कुवत वाढविणारी व त्यांना
स्वतःच्या पायावर उभी करणारी.. एक महत्त्वाची संस्थाच असते.
आपला लहानपणीचा
जास्तीत जास्त काळ हा...
शाळेत.. गुरुजन व मित्र मैत्रिणींसमवेत जात असतो.
घरी पालकांच्या व शाळेत गुरुजनांच्या...... शिस्त, देखभाल व निगराणीत मुलं
मोठी होत असतात. वाढत
असतात.
त्यांची क्षमता, कुवत
व योग्यतेप्रमाणे ती ग्रहण
करीत असतात...
व तसेच घडायला हवे.
घरातून शाळेतून उत्तेजन,
प्रोत्साहन मिळत जाते...
मुलांची प्रगती होत जाते...
त्यांच्या पंखात बळ येत
जाते आकाशात स्वतंत्रपणे झेप घ्यायला ते समर्थ होत जाते.. सक्षम बनत जाते.
.. आपल्या आयुष्यात शाळेचे, गुरुजनांचे अशा
प्रकारचे हे....
केवढे तरी मोठे, महान योगदान असते. अर्थात मुलेही तेवढीच स्पंदनशील,
टीपकागदाप्रमाणे... शिकवलेले सर्व आत्मसात
करणारी हवीत. आचरणात
आणणारी हवीत. नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी !
...... असेच होणार की !
लग्नानंतर १३ वर्षांनी
( आधी मॅट्रीक होते.) पुढील
शिक्षण सुरू केलेले.
बी. ए. पार्ट वन ते
पी एच् डी.. हा २१ वर्षाचा काळ सुवर्णकाळ वाटला होता. पण शालेय जीवनही खूप भर्जरी म्हणावे..
असेच गेले.
आज अगदी असेच मनापासून वाटते आहे.
खच्चून आणि टिच्चून म्हणावा.. असा अभ्यास करत,
सर्व स्पर्धेत, सर्व उपक्रमात भाग घेत..... कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळवत.. राज्य पातळीवरही अनेक
पारितोषिके, अनेक बक्षिसे मिळवत सर्व गुरुजनांची लाडकी विद्यार्थिनी तर झालेच होते.
सर्वप्रिय मैत्रिण म्हणूनही निवड होऊन...
निर्मलाराजे भोसले
... यांचे हस्ते प्रशस्तीपत्र
मिळाले होते.
म्हणूनच या गहिऱ्या दिवसांची आठवण झाली की प्रकर्षाने वाटतं.
चला परत शाळेला.
@ 05 डॉ. शरयू शहा.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
विचारमंथन
आई शाळेत जायचंय मला
नमस्कार
आमच्या घरात मीच मोठी.पहिली बेटी धनाची पेटी,वडीलांची लाडकी लेक,
कर्जत माझे माहेर. आम्ही वाड्यात रहायचो.वाड्यात एकी होती.बरोबरीची मुले मुली खूप .इतरांचे पाहून,मी हट्ट धरला मलाही शाळेत जायचेय.बालवाडीत घातले आईने मला.गणपतीच्या देवळात शाळा भरत असे.आईची मैत्रिण मंजूमावशी शाळा घ्यायच्या.वय चार .वार. महिने ,नक्षत्र तोंपाठ होते घरी धार्मिक वातावरण होते शुभंकरोती परवचा इ.आईने शिकवले होते त्यामुळे बाईंची मी लाडकी. पण मी एका ठिकाणी बसत नाही सारखी जागा बदलते अशी त्या आईकडे लटकु तक्रार करत.नंतर मराठी शाळा ,जीवन शिक्षण मंदिर.१ली ते ४थी पर्यंत तेथेही मी सर्वांची लाडकी होते जोशी बाई वाड्यातच रहात.पाटील गुरुजी म्हाथात्रे गुरुजी अजुनही आठवाण येते सर्वांची.प्रार्थना म्हणायला आम्ही तिघी पुढे असू
नंतर अभिनव ज्ञान मंदिर १२वी पर्यंत मग k m c collage खोपोली .ते मी नोकरी करुन शिकले रेल्वेत नोकरी होती.अजुनही शाळेची आठवण येते
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा.
आवडती कविता.माझे निबंध बाई वाचुन दाखवायला सांगत मला सर्वांना,चित्रकला मात्र यथातथाच b grade.
पाच वर्षापूर्वी आमच्या शाळेच्या १० वी १२ वी बँचचे स्नेहसंमेलन झाले.
सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटले.तो काळ जुना ७६ची नवी दहावीची बँच,मुलेमुली फार बोलत नसू आम्ही पण आता दिलखुलास गप्पागोष्टी झाल्या .मजा आली तो अविस्मरणिय दिवस होता आमच्यासाठी.
आता आमची मुले काँलेजात होती .आणि मुले आम्हाला शाळेत सोडायला आली होती माझा मुलगा गाडी चालवत होता .आहे की नाही गंमत .
स्कूल चले हम चाळीशीत.
टीव्ही वर सलिल कुलकर्णींची शाळेला भेट देण्याची सिरियल झाली नि वाटले आपणही आता शाळेत असतो तर मजा आली असती
त्यावर मी कविता केलेली.
पुनः वाटते लहान व्हावे
शाळेत पुनश्च फिरुनी जावे
सलिलदाने शाळेत यावे
सोपे सोपे प्रश्न विचारावे.
टीव्हीवरती आम्ही दिसावे
पुनं वाटते लहान व्हावे.
इति लेखनसीमा
प्राची देशपांडे
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
विचारमंथन
आई शाळेत जायचंय मला
नमस्कार
आमच्या घरात मीच मोठी.पहिली बेटी धनाची पेटी,वडीलांची लाडकी लेक,
कर्जत माझे माहेर. आम्ही वाड्यात रहायचो.वाड्यात एकी होती.बरोबरीची मुले मुली खूप .इतरांचे पाहून,मी हट्ट धरला मलाही शाळेत जायचेय.बालवाडीत घातले आईने मला.गणपतीच्या देवळात शाळा भरत असे.आईची मैत्रिण मंजूमावशी शाळा घ्यायच्या.वय चार .वार. महिने ,नक्षत्र तोंडपाठ होते घरी धार्मिक वातावरण होते शुभंकरोती ,परवचा इ.आईने शिकवले होते त्यामुळे बाईंची मी लाडकी. पण मी एका ठिकाणी बसत नाही सारखी जागा बदलते अशी त्या आईकडे लटकी तक्रार करत.नंतर मराठी शाळा ,जीवन शिक्षण मंदिर.१ली ते ४थी पर्यंत तेथेही मी सर्वांची लाडकी होते.अभ्यासात पुढे एकपाठी . जोशी बाई वाड्यातच रहात.पाटील गुरुजी ,म्हात्रे गुरुजी पाटणकर बाई अजुनही आठवण येते सर्वांची.प्रार्थना म्हणायला आम्ही तिघी पुढे असू
नंतर अभिनव ज्ञान मंदिर १२वी पर्यंत मग k m c collage खोपोली .ते मी नोकरी करुन शिकले रेल्वेत नोकरी होती.अजुनही शाळेची आठवण येते
ही आवडते मज मनापासूनी शाळा
लाविते लळा ही
जसा माऊली बाळा.
आवडती कविता.माझे निबंध बाई वाचुन दाखवायला सांगत मला सर्वांना,चित्रकला मात्र यथातथाच b grade.
पाच वर्षापूर्वी आमच्या शाळेच्या १० वी १२ वी बँचचे स्नेहसंमेलन झाले.
सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटले.तो काळ जुना ७६ची नवी दहावीची बँच,मुलेमुली फार बोलत नसू आम्ही पण आता दिलखुलास गप्पागोष्टी झाल्या .मजा आली तो अविस्मरणिय दिवस होता आमच्यासाठी.
आता आमची मुले काँलेजात होती .आणि मुले आम्हाला शाळेत सोडायला आली होती माझा मुलगा गाडी चालवत होता .आहे की नाही गंमत .
स्कूल चले हम चाळीशीत.
टीव्ही वर सलिल कुलकर्णींची शाळेला भेट देण्याची सिरियल झाली नि वाटले आपणही आता शाळेत असतो तर मजा आली असती
त्यावर मी कविता केलेली.
पुनः वाटते लहान व्हावे
शाळेत पुनश्च फिरुनी जावे
सलिलदाने शाळेत यावे
सोपे सोपे प्रश्न विचारावे.
टीव्हीवरती आम्ही दिसावे
पुनं वाटते लहान व्हावे.
इति लेखनसीमा
प्राची देशपांडे
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
🌹🍁चिंतनस्पर्धा 🍁🌹
🌷चला शाळेला🌷
आजचा विषय आहे...
चला शाळेला
शाळेची आठवण झाली की खरंच अजूनही.. म्हणजे
वयाच्या बहात्तरीत असतानाही वाटत राहतं..
परत लहान व्हावं... शाळेत जावं... लक्ष देऊन बाईंचं
शिकवणं ऐकावं.... मन लावून अभ्यास करावा... उत्तम गुण प्राप्त करावेत..
शाळेतील प्रत्येक स्पर्धेत
हिरिरीने भाग घ्यावा...
पूर्ण प्रयत्नांनी पहिला नंबर
काढावा आणि बाईंची शाबासकी मिळवावी.
खरोखर ही सारी स्वप्नं
शाळेतच पूर्ण होतात.
शाळा म्हणजे मुलामुलींच्या मनावर उत्तमोत्तम संस्कार
करणारी, त्यांच्या जीवनाला सुयोग्य वळण लावणारी,
मलांची क्षमता, योग्यता,
कुवत वाढविणारी व त्यांना
स्वतःच्या पायावर उभी करणारी.. एक महत्त्वाची संस्थाच असते.
आपला लहानपणीचा
जास्तीत जास्त काळ हा...
शाळेत.. गुरुजन व मित्र मैत्रिणींसमवेत जात असतो.
घरी पालकांच्या व शाळेत गुरुजनांच्या...... शिस्त, देखभाल व निगराणीत मुलं
मोठी होत असतात. वाढत
असतात.
त्यांची क्षमता, कुवत
व योग्यतेप्रमाणे ती ग्रहण
करीत असतात...
व तसेच घडायला हवे.
घरातून शाळेतून उत्तेजन,
प्रोत्साहन मिळत जाते...
मुलांची प्रगती होत जाते...
त्यांच्या पंखात बळ येत
जाते आकाशात स्वतंत्रपणे झेप घ्यायला ते समर्थ होत जाते.. सक्षम बनत जाते.
.. आपल्या आयुष्यात शाळेचे, गुरुजनांचे अशा
प्रकारचे हे....
केवढे तरी मोठे, महान योगदान असते. अर्थात मुलेही तेवढीच स्पंदनशील,
टीपकागदाप्रमाणे... शिकवलेले सर्व आत्मसात
करणारी हवीत. आचरणात
आणणारी हवीत. नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी !
...... असेच होणार की !
लग्नानंतर १३ वर्षांनी
( आधी मॅट्रीक होते.) पुढील
शिक्षण सुरू केलेले.
बी. ए. पार्ट वन ते
पी एच् डी.. हा २१ वर्षाचा काळ सुवर्णकाळ वाटला होता. पण शालेय जीवनही खूप भर्जरी म्हणावे..
असेच गेले.
आज अगदी असेच मनापासून वाटते आहे.
खच्चून आणि टिच्चून म्हणावा.. असा अभ्यास करत,
सर्व स्पर्धेत, सर्व उपक्रमात भाग घेत..... कधी पहिला कधी दुसरा नंबर मिळवत.. राज्य पातळीवरही अनेक
पारितोषिके, अनेक बक्षिसे मिळवत सर्व गुरुजनांची लाडकी विद्यार्थिनी तर झालेच होते.
सर्वप्रिय मैत्रिण म्हणूनही निवड होऊन...
निर्मलाराजे भोसले
... यांचे हस्ते प्रशस्तीपत्र
मिळाले होते.
म्हणूनच या गहिऱ्या दिवसांची आठवण झाली की प्रकर्षाने वाटतं.
चला परत शाळेला.
@ 05 डॉ. शरयू शहा.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
मी सुलभा कुलकणीॅ
विचार मंथन
आई!मला शाळेत जायचे!
माझे वय सागायला वाटते लाज. तरी मला आजही शाळेत जावेसे वाटते. पिशवीचे दप्तर,दगडी पाटी पेन्सील पट्टी, पाटी पुसायचे फडके व स्पंजाची डबी आठवते सारे!
माझे शिक्षक, माझ्याबाई आणि माझ्या शाळेची ईमारत नळबाजार म्यु म. शाळा 4था कुभारवाडा.अशी पाटी लिहीलेली शाळा आठवते.
याच शाळेत आयुष्याची सुरूवात करतो आहे हे न कळणारे वय! पण पाटीवर गमभन आणि12345 हे अंक काढल्यावर पाठीवरची शाबासकी आठवते. पण अक्षर खराब म्हणून ग 25वेळा गिरवावा लागला हे ही आठवते.
हळूहळू अभ्यासची लागलेली गोडी चालीवर म्हटल्या जाणा-या कविता गाणी. हावभावयुक्त गोष्टी सगळे आठवते फूलपाखरू छान किती दिसते. नाच रे मोरा लहान माझी बाहुली नाचून म्हणून दमल्यावर वाटीतील गूळशेगदाणे चवीचे आठवतात
हळूहळू सवाॅची लाडकी
सोनू 4थी पास झाली आणि नळबाजार शाळा सुटली खेतवाडी शाळा 7वी पयॅत नंतर पुढे कन्याशाळा मॅट्रीकची परिक्षा.3वेळा शाळेचा निरोप समारंभ अनुभवावा लागला.शाळा सोडताना खूपच वाईट वाटले पण अजूनही आवडते मज मनापासूनी शाळा असेच म्हणावेसे वाटते.
नातवाबरोबर शाळेत जाण्याचा हट्ट धरावासा वाटतो. बसायला आसन,
पहिला बाक मित्रमैत्रीणी शाळेत मिळणारा खाऊ मुख्य शिक्षणाची आवड म्हणून आता म्हणावेसे वाटते.
प्रतिक बाळा तुझ्या आजीला तुझ्याबरोबर मला पण शाळेत जायचे आहे.
आज विचारमंथनाने संधी मिळवून दिली त्याबद्दल साहित्यमंथनचे आभार
चला आता गझलशाळेत जाऊ या. ती पण शाळाच ना!
चला आई दादा मला शाळेत जायचे! नाव घाला माझे.
नमस्ते गुरूजी आणि बाई.
धन्यवाद दप्तर भरते आहे.
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
काही दिवसापुर्वी मी एक सत्त्य लघुकथा लीहीली होती..ही कथा माझा अनुभव आहे व या कथेतील पात्र " सुकेशना " ही आपल्या आई वडीलांना न बोलता ही अबोलपणे हेच सांगतेय की
" आई,शाळेत जायचय मला "
👇👇👇👇👇👇👇👇
मी मूलगी म्हणून का ?
"सर, माझ्या वडीलांनी क्लासला जायच नाही असं सांगितलय,"आठवीत असणाऱ्या सुकेशनाचा थरथरता आवाज माझ्या अंतरमनाचा ठाव घेत होता...मी म्हटलं,"का गं?" ती म्हणाली," सर माझा लहान भाऊ चौथीत शिकतोय,इंग्लीश मेडीयमला..वडील म्हणतायत की त्याची शाळेची फीस व ट्युशनची फीस भरायचीय,तुझी ट्युशन बंद कर...त्याची फीस भरेन तुझी भरणार नाही.."मला सर्व काही कळालं होतं..
तीनं सांगीतलेलही अन् न सांगीतलेल ही..आजही मुलगा आणी मुलगी हा फरक
होतोय..सरकारी शाळेत शिकणारी सुकेशना...अतिशय हुशार मुलगी..सतत काही तरी नवीन शिकण्यासाठी धडपडणारी..इतक्या लहान वयातही आपलं मन मारुन जगतेय तिच्या वाट्याचं भावाला देतेय..माझं मन आतुन झुरत होतं..का असा फरक...?
न राहवून मी शेवटी तिच्या घरी फोन केला..योगायोगाने फोन तिच्या आईने उचलला...मी विचारलं," सुकेशनाला ट्युशनसाठी नको का म्हणताय..हुशार आहे ती..येऊ द्या तिला..पलीकडुन आवाज आला," सर नको म्हटलेत हो हेनी,पैसे नाही म्हणत्यात". मी म्हटल,"मुलाला महागड शिक्षण देताय अन् मुलीला असं का करताय हो" माझा बोलण्याचा अधिकार नव्हता तरीही न राहवून हेे शब्द गेले..या शब्दाने जणु त्या माऊलीच्या मनाचा बांधच तुटला..
"असच करत्यत सर हेनी, पोरीला साधी वही बी घेऊन देत न्हाईत,पोरगी बी लई घाबरत्याय त्यांना...काय सुद्दीक बोलत नाय त्यांच्या म्होरं" आवाजातील कंप वाढत गेला..त्या आवाजातील द्रावकता हृदयाला जाऊन भिडली....मातेचा आपल्या मुलीसाठी तुटणारा जीव व स्त्री असल्याकारणाने स्त्री जातीबद्दल तीला वाटणारी अनामीक ओढ जाणवली..
माझा त्या वर्गावरील तास संपला होता..पुढील तास घेण्यासाठी संपत गायकवाड सर येऊन थांबले होते..त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील भाव जाणले असावे कदाचीत..ते म्हणाले..
" Any problem sir..? "
मी सर्व हकिकत सांगितली...त्यांनी लगेच उत्तर दीलं," सुकेशनाला १०वी पर्यंत कोणतीही फीस घ्यायची नाही..गरज पडल्यास वह्या पुस्तकाचा खर्च ही आपण करु" माझ्या मनावरचा फार मोठा भार कमी झाल्यासारख वाटल..
वाटलं की दोन समविचारी व्यक्ती एकत्रीत आल्यानंतर कामं सोपी होतात...आणि होतातच..सुकेशनाच्या वडीलांना भेटण्याची अतीदाट इच्छा मनात होती...क्लास सुटल्या नंतर भेटीसाठी गेलो..गळ्यात वारकरी संप्रदायी लोकांची माळ,कपाळावर गंधाचा टीळा आता या माणसाला काय बोलावं..?
संपत सरांनी व मी एकमेकांकडे पाहुन स्मीत हास्य केलं..सुकेशनाच्या आईने चहा घेऊन जाण्याचा आग्रह केला..चहा घेत घेत सुकेशनांच्या पालकांना आमचा निर्णय सांगितला..सुकेशना व तीच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव ही आमची अमुल्य कमाई घेऊन आम्ही तेथुन नीघालो...आज मनाला खुप मोठी शांती लाभली होती..
@ उत्कर्ष देवणीकर
उमरगा
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
"आई,शाळेत जायचं मला"
सध्या शाळाना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. पण आज मध्यमवर्गीय पालक आपल्या पाल्याना शाळेत प्रवेश देण्यासाठी आपल्या शहरातीलच नाही तर आजूबाजूच्या मोठ्या शहरातील शाळानशाळा पिंजून काढत आहेत कारण त्याना आपल्या पाल्याला उत्तमात उत्तम शाळेत प्रवेश मिळवून द्यायचा आहे. आपल्या पाल्याने आत्तापासूनच म्हणजे वयाची अडीच वर्षे पूर्ण केले तेव्हापासूनच तो उत्कृष्ट हवा आहे. आज त्याचा पाया पक्का होऊन त्याच्या वयोगटातील मुलांसोबत तो स्पर्धेत अव्वल राहिला पाहिजे,ही मध्यमवर्गीय पालकांचे स्वप्न आहे आणि त्यासाठी हा उन्हाळा सुध्दा त्याना स्वस्थ बसू देत नाही. प्रत्येक शाळेला भेट देऊन इमारत,तेथील भौतिक सुविधा,तेथील विषय,शिकविणारे शिक्षक या सर्व बाबींची कसून पाहणी सुरु आहे. एवढेच नाही तर, घरी येऊन पुन्हा पती-पत्नी,शेजारीपाजारी,यांच्यात चर्चा करुन भरमसाठ देणगी सह शाळेची फीस भरून मुलाचा प्रवेश निश्चित केला जातो. एकदा प्रवेश केला की,मग सुरु होते शालेय साहित्याची उच्चदर्जाची खरेदी! आठवड्यातील कमीत कमी तीन गणवेश,तीन शूज,स्कूलबॅग,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाजवतील अशा वह्या,वेगवेगळ्या प्रकल्पाची पुस्तके अन् अजून बरेच काही!हे सगळे करताना पालकाना फक्त एक समाधान असते की,आपण आपल्या मुलाला प्रतिष्ठीत शाळेत टाकून आपण आपली प्रतिष्ठा जपली.हे आहे मध्यमवर्गीय मुलांचे शाळेत जाणे.
हे आहे आपल्याभोवतीचे वलय! हे मर्यादित वलय सोडून आपण थोडे दोन पावले पुढे गेल्यावर लक्षात येईल की,"आई,मला शाळेत जायचंय!" ही आर्त हाक हवेतच विरुन जाते. आपल्या देशात दारिद्र्य आणि श्रीमंती ही विषमता कमालीची आहे. एकीकडे शाळेत प्रवेश द्यायचा म्हणून पायपीट तर दुसरीकडे पोटासाठी हिंडणाऱ्या लोकाना मुलांच्या शिक्षणाबाबत कमालीची उदासिनता आहे. उदासिनता म्हणण्यापेक्षा शिक्षणापेक्षा पोट भरण्याचा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा असतो. त्या मुलाना ना पोटभर अन्न मिळतं ना अंगभर कपडा! आपला मुलगा शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा आज त्याने काम करुन कुटुंबाला हातभार लावणे,आणि आईवडील कामावर गेल्यावर मुलीने घरकाम करुन लहान भावंडाना सांभाळणे,ही त्यांची गरज असते.
अशा कुटुंबातील मुलामुलींनाही आपल्या आजूबाजूची मित्रमैत्रिणी शाळेत जातात,छान गणवेश घालतात,पाठीवर दप्तर टाकून गाडीत बसून जातात,तो/ती पाठीवर दप्तर टाकतो तेव्हा ह्याच्या डोक्यावर भारा तर हिच्या कडेवर लहान भावंड किंवा पाण्याची घागर असते. तेव्हा याचेही मन आतून साद घालते,"आई,मला शाळेत जायचंय!" पण ही हाक ऐकायला त्याच्या आईला वेळच कुठे असतो?? त्या लेकरांच्या डोळ्यांत स्वप्न पेरायला किंवा किंवा त्याच्या डोळ्यातील स्वप्न वाचायला वेळ नसतो.
ही दरी मिटविणे शक्य नसले तरी यातील अंतर आपण बरेचसे कमी करु शकतो.
"जाणवाया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना,
तेवत्या राहो सदा रंध्रातूनी संवेदना"
या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्या संवेदना जागृत असल्या तर आपण हे विषमतेचे अंतर निश्चितच कमी करु शकतो. आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणावर जेवढा खर्च करतो,त्याच्या २०% जरी खर्च आपण अशा गरजवंताच्या शिक्षणावर केला तरी त्या वंचिताचे "आई,मला शाळेत जायचय!" हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तोही भावी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो व माणूस म्हणून स्वाभिमानाने जीवन जगू शकतो.
संगीता देशमुख,वसमत @59
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
साहित्य मंथन – विचार मंथन द्वारा –आयोजित स्पर्धा – भाग –५५वा.
विषय – आई शाळेत जायचय मला प्रेषक—कुंदा पित्रे (४६)
खरं म्हणजे वरील शब्दच माझ्या वाट्याला आले नाहीत.कारण एकत्र कुटुंबात आई हा शब्दच हरवला होता.शिवाय माझे वडिल गावातील मोठी थोर व्यक्ती होती. शाळा त्यांनीच स्थापन केलेली होती. मी भावंडातील शेंडेफळ मग काय मोठी भावंडे ज्या शाळेत गेली तिथेच मी जाऊ लागले. खर तर माझे शिक्षण त्रिस्थळी,त्रिवेणी संगमावर उभे आहे.पण ममाझे पहिली ते सातवी गावाच्या शाळेचे शिक्षण परत येईल कां ? जशी पहिली नेसलेली साढी,पहिलं प्रेम,पहिला पाऊस याला जसं ह्रदयाच्या कोप-यात घट्ट स्थान असते ना ! तसं हा विषय मिळाला व साठ वर्षापूर्वीचा काळ जिवंत झाला.नव्या पुस्तकांचा नाकात शिरलेला वास अजूनही रेंगाळतोय आता जरी मोठाली पुस्तके पालथी घातली तरी.,पावसात कागदी होड्या करुन सोडण्यापासून ते आंब्याच्या दिवसात कै-या पाडून फ्रॉकच्या खिशात मीठ तिखट आणून मैत्रीणीबरोबर घेतलेला आस्वाद, शाळेत साजरा होणारा शारदोत्सव त्यात घेतलेला सहभाग,आवाज बरा असल्याने रोज म्हटलेली प्रार्थना,झेंडावंदनाच्या वेळी म्हटलेली स्वातंत्र्यगीते.वरं अभ्यासात वा शाळेत कधी स्पर्धा नसत,दोन हजार वस्तीच गांव तेथे कुठे स्पर्धा वगैरे पण माझा वर्गात नेहमी दुसरा तिसरा नंबर असे कारण गणित हे यमदुतासारखे भासे.असो.फ्रॉकातून, परकरातून,साडीत आले कळलेच नाही कारण सातवी झाल्यावर पुढिल शिक्षणाचे दरवाजे बंद झाले.पण घरातील स्त्री,मनोहर,किर्लोस्कर ४५० जुने अंकाची पारायणे केली. शाळेत जायचेच हा अंकुर मात्र कायम जागृत राहिला. तब्बल सहा वर्षानी मुंबईत येणे होऊन आठवीत प्रवेश व विवाहाची वेदी देखील पार झाली. परंतु शाळेत जायचयं हे ब्रीद कायम गिरगांवातल्या मुलींच्या शाळेत प्रवेश तिथे सुध्दा दुसरा नंबर कधी सोडला नाही. इथेही वर्गातील मुली पांचवीपासुन इंग्रजी घेतलेल्या मी तेव्हा एबीसीडी शिकत होते – म्हणून इंग्रजी – परकी ती परकीच राहीली.तिच्याशी नाळ जुळलीच नाही. एसएसी(अकरावी)साठाला थोडे कमी मार्कस् मिळवून गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले परत सासुरवाशीण ! कौतुक कोण करणार ! कारण वयाने मोठी म्हणून शाळेत अनफिट,घरात शिक्षण कमी म्हणून अनफिट हे कळले तरी मनातला पुढील कॉलेज शिक्षणाचा वसा सोडणार नव्हतेच पण मला नवागताची चाहुल लागली. जुळे जन्माला आले मग पुढे परत चार वर्षे शिक्षण डोक्यातून बाजूला पडले,चार वर्षानंतर मला मिस्टरांचे गुरुजी भेटले त्यांचा एस एन डी चा क्लास होता म्हटले चला कॉलेज नाही तरी बाहेरुन तरी शिकून पुढे जायला काय हरकत आहे. कारण मुले अगदीच छोटी होती आणी शिकायची तहान मी तडक एम एम मराठी घेऊन पुर्ण केली तिथेसुध्दा हायर सेकंड क्लास सोडला नाही. या शिक्षणाच्या त्रिस्थळी यात्रेत मला चांगले मार्गदर्शक ,गुरुजन भेटले. मनाची मशागत नितळ,साजरी गोजीरी झाली. बाहेरच जग कसे असते त्याचा अनुभव मिळाला. आयुष्याची जडण घडण मजबूत झाली. विचाराना दिशा मिळाली.मुलं लहान शिवण शिकले पण पुढे उपयोग केला नाही मग गायन शिकत होते पण वयाच्या ५५ वला भवगीत शिकू लागले पण काही अडचणीमुळे सोडले. रेकी दोन भाग शिकले.एक्युप्रेशर शिकले. पण उपयोगात आणले नाही. पण अरोमा थिअरपी शिकले ती इतकी भावली की, आजही मी गुडघ्यावरची तेले बनवून देते. मालीश ,फेसियल करते.१९७६ ते १९९२ पर्यत माझे वाचन थांबले होते. पण १९९२ ला लोकसत्तात सहज म्हणून दिलेला लेख प्रकाशित झाला व मी हातात लेखणी घेतली. ब-याच मोठमोठ्याच्या मुलाखती घेतल्या व कथा लिहल्या. साहित्य मंथन परिवारात दाखल होऊन लिखाणकाम व साहित्याचे पदर शिकतेच आहे. आता संध्याकाळ हळूङळू सरकत येत आहे. पण गांवाची छोटी शाळा विसरु शकत नाही. आतासारखी चढाओढ नव्हती,शिक्षण महाग नव्हते,आम्हा मुलांच्या मनात अतिरेकी विचार नव्हते. सुंदर बालबोध वातावरण होते. फुलपाखरां रंगीवेरंगी मन होतं.मैत्रीणीचं गीत होतं,मला शिकायचयं हा ध्यास मात्र मी माझा पुरविला कोणाच्याही प्रोत्साहनाशिवाय,प्रेमाशिवाय! अजूनही नवं शिकण्याचा उत्साह आहे. त्याचे पडघम माझ्या मनांत वाजत असतात. साहित्यमंथनला धन्यवाद माझ्या मनातले लिहण्याची संधी दिल्याबद्दल!!
प्रेषक – कुंदा पित्रे- दादर,मुंबई ९३२४७४२७०६
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
आई मला शाळेत जायचय .....
काहीवर्षांपूर्वी म्हणजे २०१३ ला ...माझी बँकेतून सेवानिवृत्ती झाल्यावर मला महाराष्ट्रातील धुळे झील्ल्यात शहादा येथे एक खेडेगावातल्या शाळेला भेट देण्याचा योग आला .मझी नणंद तिथे गेली ३५ वर्ष सातत्याने काम क रते आहे .पुरवी तिचे पती व ती एक शाळा चालवत आणि त्यांचा स्वतःचा मुलगा पrimary पर्यंत त्याच शळेत शिकला..नंतर मुंबईला येवून उच्च शिक्षण घेवून सध्या सिंगापोर इथे phd करत आहे .असो
ती शाळा पाहून मी थक्क झाले मुलांचे १० च्या संखेत गट पाडले होते व प्रतयेक गटाला एक
शिक्षक! सर्व शिक्षक मुंबई अथवा कुठल्यातरी शहरातला ....त्यामुळे शिकवण्याला पण चांगला दर्जा !शिस्त तर एवढी की मुलांना कामं नेमून दिलेली असतात ....काहीजण झाडलोट तर काहीजण सुशोभीकरण ...म्हणजे दारापुढे अंगणातल्या फुलांची रांगोळी...पानांनी सजावट वगैरे....त्यामुळे मुलांची creativity दिसते...
वर्ग सुरु झाल्यावर शिस्तीत नेमलेला monitor त्याचं काम करू लागे कांही मुल शळेत अनवाणी येत
आई मला शाळेत जायचं आहे एवढच पुष्कळ असतं त्यांच्यासाठी ...शिकवताना distraction अजिबात नाही कारण तयांना दुसरं काही distraction नसतच .शिक्षकांचं मात्र प्रचंड कौतुक वाटलं.अश्या मुलांना घडवणं हे अत्यंत चाल्लेन्गिंग काम वाटलं.
आपण पहातो कि ह्यातलाच एखादा मुलगा पुढे जाऊन नांव काढतो.....जस माझ्या नणंदेचा मुलगा स्वतःला सिद्ध करतो आहे ....एवढंच नाही तर सिंगापोर हून आल्यावर तोही त्याच गावी योगदान देणार आहे
आपल्यला सर्व सुलभ मिळूशत असतांना अशाप्रकारे त्याग करणार्यांना माझा salaam
🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
नयना कुलकर्णी.....१५
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
आई मला शाळेत जायच आहे!
हा विषय वाचला आणि माझ बालपण डोळ्यापुढे आल.
माझा जन्म मुंबईचा.लहान कुटुंब. दोन भाऊ ,मी एकटी आई ,वडिलांची लाडाची लेक. माझ्यांत आणि माझ्यांत अवघ दिड वर्षांचे अंतर. दोघांनाही एका वर्गांत बसविले. मी बडबडी, धिटुकलीम्हणुन सर्वांची लाडकी. वर्गांत सर्वांनपेक्षा लहान,म्हणुन शाळा सुटल्यावर ,सर मला खांद्यावर बसवुन घरी सोडायचे. अशी १,२ री घराजवळ शाळा होती ती संपली . मग किंगजाॅर्ज सारख्या मोठ्या शाळेत जायला लागलो. बाई कडक होत्या. शिक्षा म्हणुन डस्टर फेकुन मारायच्या. पण त्या पण माझ्या हुषारीवर, धीटाईवर खुष होऊन ,मला माॅनेटर केले .नाचांत, नाटकांत घ्यायच्या. भाऊ माझा पाठीराखा होता.दिड वर्षांनीच मोठा पण काळजी घ्यायचा. घरी भांडायचा,दादागिरी करायचा पण वर्गांत पाठराखण करायचा. सगळ्या बाईंची लाडकी होते.
पाचवी पासुन मुला-मुलींची शाळा वेगळी झाली तेव्हां भाऊची ऊणिव जाणवायची. शाळेत शिस्त ,पद्धत,पाढे मराठीच्या कविता खुप सुंदर शिकवायच्या . त्या चालीवर अख्खा वर्ग म्हणायचा. त्यामुळे कवितांची गोडी लागली. शाळेला मोठ्ठे पटांगण. त्यात लंगडी, हुतुतु,डाॅजबाॅल,लेझीम सर्व खेळ शिकलो. गॅदरिंगला नाच, नाटुकली केली त्यामुळे धीटपणा आला. वक्रुत्व स्पर्धेत भाग घेतल्यांने कसे बोलावे हे बाईंनी शिकविले. तिसरी ते अकरावी एका बाकावर कांचन होती त्यामुळे अजुनही घट्ट मैत्री राहिली आहे.फक्त गाण्याचा गळाभेट नसल्याने गाण््याच्या तासाला बाई बडबड केली कि ,शिक्षा करायच्या. पण तितकेच प्रेमही करायच्या.
अशी माझी शाळा सुंदर, बाई, मैत्रिणी खुप शिकवुन गेल्या. तीला कधीच विसरणार नाही. पुढला जन्म असलाच तर परत ह्याच शाळेत मला जायचंय !
सौ. निलाक्षी विद्वांस ६८
स्पर्धेसाठी .
♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢♢
♢♢♢♢संकलन समाप्त ♢♢♢♢



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा