गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

पाणी वाचवा

!!!!!!!!!!!!!!

॥ पाणी जीवन ॥
पेटलं र पाणी पेटलं र
कोरड्या बोराच धुराळा उठला र !॥धृ॥
तोडुन झाडे बांधली घरे
वनराईचा विचार खुंटला र॥१॥

नाही केले पुनर्भरण
नदी,नाले जाती वाहून ॥
कसा कणखर उन्हाळा पडला
तेव्हा दुष्काळ पाण्याचा वाढला र॥२॥

नका तोडू झाडे हो कोणी
म्हणून सृष्टीची होते की हानी ॥
लावा एकतरी झाड जीवनी
विनवत गजआनंद कर जोडूनी॥३॥
✍🏻----गजानन पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा